ताज्या घडामोडी

थकीत शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर बँकांची जुलूमशाही; ३० डिसेंबरला महागाव तहसीलवर लाल बावट्याखाली तीव्र आंदोलन

  ⚫लोकवेध न्यूज नेटवर्क: महागाव:-    महागाव तालुक्यात राष्ट्रीयकृत बँकांकडून थकीत शेतकऱ्यांच्या खात्यांवर निर्बंध लादून

महागांव येथे कमलबाई काप्रतवार यांचे दुःखद निधन;आज दुपारी अंत्यसंस्कार

  ⚫ लोकवेध न्युज नेटवर्क    महागाव :-  महागांव येथील श्रीमती कमलबाई बालाजी काप्रतवार (वय

यू-डायसविना शाळा,नियमांना हरताळ : महागावात ‘नामांकित’ शाळेचा प्रवेश घोटाळा उघड

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव :   यू-डायस (U-DISE) क्रमांक नसतानाही चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे

लोकाभिमुख तहसीलदार अभय मस्के यांचा वाढदिवस साजरा; तहसील कार्यालयात वृक्षारोपण

  ⚫लोकवेवेध न्यूज नेटवर्क महागाव : – महागाव तहसीलचे कर्तव्यदक्ष, लोकाभिमुख व गोरगरीब जनतेच्या अडचणींना

बाबासाहेब आम्ही बेईमान झालोत !  आत्मपरीक्षणाची ज्वाला पेटवणारे आंबेडकरी साहित्य (पुस्तक प्रकाशन)

  ⚫लोकवेध न्युज नेटवर्क महागाव  : – भैय्यासाहेब उर्फ यशवंतराव आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने १२ डिसेंबर

ताज्या बातम्या

कर्जबाजारीपणा व अतिवृष्टीला कंटाळून प्रगतशील शेतकऱ्याची आत्महत्या ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क / २० फेब्रुवारी महागाव ; महागाव तालुक्यातील वागद इजारा येथे सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि चालू खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या प्रगतशील शेतकरी मनोहर नानू राठोड (वय अंदाजे ४५) यांनी १९ फेब्रुवारी रोजी बुधवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता आपल्या शेतात विष प्राशन करून जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना घडली.या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. मनमिळाऊ, प्रेमळ व मितभाषी स्वभावामुळे मनोहर राठोड हे गावात सर्वांच्या परिचयाचे होते. सामाजिक कार्यातही ते नेहमी अग्रेसर असत. अत्यल्प भूधारक असलेल्या राठोड यांची शेती कोरडवाहू असून त्यांच्या नावावर बँकेचे कर्ज होते. चालू खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे पूर्णपणे हातचा गेल्याने ते मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले होते. घटनेची माहिती मिळताच गावचे नाईक अशोक धर्मा जाधव व शेतकरी नेते मनीष जाधव यांनी तलाठी तिडके यांना तसेच ग्रामीण पोलीस स्टेशन पुसद येथे प्राथमिक माहिती कळविली. पुढील कार्यवाही सुरू आहे. त्यांच्या पश्चात पाच भाऊ व एक मुलगा असा परिवार आहे. दरम्यान, शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याने शेतकरी संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ते मनीष जाधव यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत, प्रधानमंत्री पीक विम्याचा लाभ व तातडीच्या ठोस उपाययोजना देण्याची मागणी केली आहे. अडचणीच्या काळात आर्थिक मदत न मिळाल्याने शेतकरी उध्वस्त होत असून शासनाने तातडीने संवेदनशीलतेने हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली.