पोलिसांची ११९ जणांची बॅच त्यांच्या हक्काच्या पदोन्नतीसाठी १३ वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत; गृहमंत्री घेणार का दखल ?

पुणे | गेले अनेक वर्ष अनेक नेतेमंडळी व मंत्रालयामध्ये प्रलंबित प्रश्न विषयी संबंधित खात्याकडे वारंवार पाठपुरावा करून देखील हा विषय प्रलंबित ठेवण्यात येत आहे अक्षरशः संबंधित प्रकरणांचा पाठपुरावा करता करता काही पोलीस हवालदार त्यांची वयोमर्यादा संपुष्टात आल्याचे ही समजत आहे. प्रशासन मात्र त्यांच्याप्रती उदासीन असल्याचे दिसून येत आहे मुंबई,पुणेसह महाराष्ट्रातील तब्बल ११९ जणांची एक बॅच त्यांच्या हक्काच्या पोलीस उपनिरीक्षक या पदोन्नतीसाठी गेल्या तेरा वर्षापासून झगडत आहे. आता ड्युटीवर असताना कोरोना संकटप्रसंगी मृत्युमुखी पडण्या आधी तरी हक्काची पदोन्नती याच जन्मी पाहायला मिळेल का ? असा सवालही हे पोलिस विचारत आहेत. न्यायालय आणि सामान्य प्रशासन विभाग यांनी अनुकूलता दर्शवली असून ही गेली तेरा वर्षे सरकार कडून केवळ कागदी घोडे नाचविण्यात येत आहेत. आता या ठाकरे सरकार कडून तरी न्याय मिळावा अशी आशा पोलिसांनी व्यक्त केली आहे.

काय आहे नक्की प्रकरण हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे तरीदेखील कोणीही त्यांना दाद देत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे,वारंवार पाठपुरावा करून आपले कर्तव्य बजावत हे पोलीस मंत्रालय व नेतेमंडळींच्या कार्यालयाचे खेटे घालत आहेत.महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षेत पास होऊन पोलीस कर्मचारी हे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पाहत असतात. अशाच प्रकारे २००६ ते २०१६ पर्यंत च्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदी पात्र ठरलेल्या उमेदवारांन पैकी शासनाने २०१६ मधील खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक परीक्षेतील १५४ उमेदवारांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती दिली आहे, परंतु त्याच नियमांतर्गत शासनाने २००६ पासून २०१३ पर्यंतच्या खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक परीक्षेतील ११९ उमेदवारांना अद्याप पदोन्नती दिली नाही.

सदरी ११९ उमेदवार शासनाने पदोन्नती द्यावी असा सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट अभिप्राय दिलेला आहे,तसेच हा अभिप्राय गृहविभाग यांना प्राप्त झालेला देखील आहे. या विषयावर मागील अधिवेशनात लक्षवेधी द्वारे आमदार सुरेश धस यांनी विधिमंडळात आवाज उठवला होता व या विषयावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ,आमदार राहुल नार्वेकर आमदार विनायकराव मेटे यांनी देखील विधिमंडळात आवाज उठवला होता यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लवकरच ११९ उमेदवारांना पदोन्नती देण्यासाठी सरकार सकारात्मक निर्णय घेईल असे देखील सभागृहात त्यांनी आश्वासन दिले होते. परंतु कोविड-१९ या रोगामुळे सदर मिटिंग प्रलंबित आहे त्यामुळे याबाबतचा निर्णय रखडलेला दिसून येत आहे. या कर्तव्यदक्ष पोलिसांना तातडीने पदोन्नती मिळावी,गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याची लवकर दखल घ्यावी अशी मागणी या पोलिसांमार्फत करण्यात येत आहे.

गेले अनेक महिने गृहमंत्री अनिल देशमुख महाराष्ट्रातील पोलीस प्रशासनाच्या भेटीगाठी घेत त्यांचे अनेक प्रश्न सोडवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.या प्रकरणात देखील गृहमंत्री लक्ष घालून योग्य तो निर्णय घेतील अशी आशा संबंधित पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

महागावात बांधकामांची पारदर्शकता तपासणीच्या रडारवर; प्रभाग १ व ७ साठी माहिती मागणीचा अर्ज लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव :- महागाव नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ०१ व ०७ मधील सर्व बांधकामे आणि त्यावर सुरू असलेल्या व्यावसायिक उपक्रमांची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी अॅड. विवेक भाऊराव देशमुख यांनी नगर पंचायत प्रशासनाकडे अधिकृत विनंती अर्ज सादर केला आहे. सदर अर्जामध्ये प्रभागातील सर्व प्लॉटवरील बांधकामांची परवानगी, मंजूर नकाशे,तसेच संबंधित इमारतींमध्ये सुरू असलेल्या व्यवसायांची (किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, कापड दुकान, हॉटेल व इतर दुकाने) वाणिज्य परवानग्या आणि आदेश यांची सत्यप्रत मागविण्यात आली आहे. अर्जदारांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, संबंधित सर्व इमारतींच्या बांधकाम परवानग्या व नकाशे तसेच व्यावसायिक वापरासाठी आवश्यक असलेल्या वाणिज्य परवानग्या व आदेशांची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी.या मागणीमुळे प्रभागातील अनधिकृत बांधकामे किंवा नियमबाह्य व्यावसायिक वापर उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महागाव नगर पंचायत प्रशासनाकडून या अर्जावर काय कार्यवाही होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, या विषया संदर्भात प्रभाग एक आणि सात मधील व्यावसायिकांनी आणि या अर्जाच्या मागणीवर संतोष व्यक्त करत सदर तक्रारदाराच्या सनदी संदर्भात मोठी चर्चा रंगली होती.एकाच व्यक्तीचा नावे दोन लायसन कसे बरे ? असा सवालही यावळी उपस्थित केला जात असून सदर तक्रारदार नेमके कोण ? आहेत.. यात वडिलांचं बदलून गुगली..खेळी करून मी तो नव्हेच अशी तर नंतर भूमिका बजावल्या जाईल अशी जनभावना आहे. विवेक..भैय्या..सा…. की ? भाऊराव…याचा नागरिकांना संभ्रम निर्माण झाला आहे.याच प्रभात वाईनबार आहे.वाईंबार आणि देशी दारू दुकान संदर्भात येत्या काही तासांत मतदान प्रक्रिया होणार असल्याने तक्रार कर्त्याने सदर प्रभागातील नागरिकांना मुद्दाम भीती दाखविण्यासाठी तर नाही ना..हा फंडा वापरला अशा विविध चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या