वाकोडीत ईद-ए-मिलनचा स्नेहसोहळा; सर्वधर्मीय ऐक्याचा सुंदर संदेश”

लोकवेध न्यूज नेटवर्क / २८ मार्च 

 

महागाव :- 

 

महागाव तालुक्यातील वाकोडी गावात वसिफ खान हफिज खान पठाण यांच्या घरी ईद-ए-मिलन कार्यक्रम उत्साहात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती आणि बाराबलुतेदारांना एकत्रित करून स्वराज्य उभे केले,त्या प्रेरणेने धार्मिक सलोखा जपण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

या कार्यक्रमास वाकोडी ग्रामपंचायतीचे सरपंच,ग्रामसेवक,तलाठी,ग्रामपंचायत सदस्य तसेच वाकोडी व मोरथ येथील मराठी व उर्दू शाळांचे शिक्षकवृंद उपस्थित होते.विविध स्तरातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उत्साह लाभला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फरमान शेख, आदम खान,बिलाल खान,गोरख खंडागळे,महेंद्र अंडागळे आणि मारोती राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले.

सर्वधर्मीय ऐक्य,बंधुता आणि सामाजिक सलोखा वाढविणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरत असून,समाजात एकात्मतेचा सकारात्मक संदेश देणारा ठरला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महागावात बांधकामांची पारदर्शकता तपासणीच्या रडारवर; प्रभाग १ व ७ साठी माहिती मागणीचा अर्ज लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव :- महागाव नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ०१ व ०७ मधील सर्व बांधकामे आणि त्यावर सुरू असलेल्या व्यावसायिक उपक्रमांची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी अॅड. विवेक भाऊराव देशमुख यांनी नगर पंचायत प्रशासनाकडे अधिकृत विनंती अर्ज सादर केला आहे. सदर अर्जामध्ये प्रभागातील सर्व प्लॉटवरील बांधकामांची परवानगी, मंजूर नकाशे,तसेच संबंधित इमारतींमध्ये सुरू असलेल्या व्यवसायांची (किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, कापड दुकान, हॉटेल व इतर दुकाने) वाणिज्य परवानग्या आणि आदेश यांची सत्यप्रत मागविण्यात आली आहे. अर्जदारांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, संबंधित सर्व इमारतींच्या बांधकाम परवानग्या व नकाशे तसेच व्यावसायिक वापरासाठी आवश्यक असलेल्या वाणिज्य परवानग्या व आदेशांची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी.या मागणीमुळे प्रभागातील अनधिकृत बांधकामे किंवा नियमबाह्य व्यावसायिक वापर उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महागाव नगर पंचायत प्रशासनाकडून या अर्जावर काय कार्यवाही होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, या विषया संदर्भात प्रभाग एक आणि सात मधील व्यावसायिकांनी आणि या अर्जाच्या मागणीवर संतोष व्यक्त करत सदर तक्रारदाराच्या सनदी संदर्भात मोठी चर्चा रंगली होती.एकाच व्यक्तीचा नावे दोन लायसन कसे बरे ? असा सवालही यावळी उपस्थित केला जात असून सदर तक्रारदार नेमके कोण ? आहेत.. यात वडिलांचं बदलून गुगली..खेळी करून मी तो नव्हेच अशी तर नंतर भूमिका बजावल्या जाईल अशी जनभावना आहे. विवेक..भैय्या..सा…. की ? भाऊराव…याचा नागरिकांना संभ्रम निर्माण झाला आहे.याच प्रभात वाईनबार आहे.वाईंबार आणि देशी दारू दुकान संदर्भात येत्या काही तासांत मतदान प्रक्रिया होणार असल्याने तक्रार कर्त्याने सदर प्रभागातील नागरिकांना मुद्दाम भीती दाखविण्यासाठी तर नाही ना..हा फंडा वापरला अशा विविध चर्चेला उधाण आले आहे.

तहानलेल्या प्रवाशांना दिलासा; महामानवाच्या जयंतीनिमित्त महागावात ‘स्मृती पाणपोई’चे लोकार्पण लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त महागाव येथे सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.स्व. कु.श्रावणी निलेश नरवाडे हिच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रवासी व नागरिकांसाठी ‘पाणपोई’चे लोकार्पण मंगळवार,१४ एप्रिल रोजी करण्यात आले. महागाव बस स्थानक परिसरातील वाढती वर्दळ लक्षात घेता,शुभम सर्विसिंग सेंटरजवळील ट्रॅव्हल्स पॉईंट येथे ही पाणपोई सुरू करण्यात आली आहे.रणरणत्या उन्हात प्रवाशांची तहान भागविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. समता,स्वातंत्र्य आणि बंधुत्वाची शिकवण देणाऱ्या डॉ.आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत, ‘पाणी हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे’ या तत्त्वाची जाणीव करून देणारा हा उपक्रम ठरला. चवदार तळ्याच्या सत्याग्रहातून दिलेला समानतेचा संदेश या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यात आला आहे.शिक्षण आणि समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित करत,विजय खंदारे यांच्या सौजन्याने ही पाणपोई उभारण्यात आली.“माणुसकीच्या नात्याने केलेले छोटेसे कार्यही समाजासाठी मोठा संदेश देऊन जाते,असा भाव यावेळी व्यक्त करण्यात आला.या पाणपोईचे उद्घाटन भाजप समन्वयक नितीन भुतडा व आमदार किसनराव वानखेडे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष प्रमोद भरवाडे, ठाणेदार धनराज निळे, प्राचार्य शरदचंद्र डोंगरे, जेष्ठ पत्रकार गजानन वाघमारे, संजय भगत, महागाव पत्रकार महासंघाचे अध्यक्ष गणेश भोयर, ज्ञानेश्वर ठाकरे, निलेश नरवाडे यांच्यासह अनेक पत्रकार व नागरिकांची उपस्थिती होती. स्व. श्रावणीच्या स्मृती जपत उभारलेली ही ‘पाणपोई’ आता महागावातील प्रवाशांसाठी दिलासा ठरत, समाजसेवेचा जिवंत संदेश देत राहणार आहे.