गुंज एजी फिटरवरील सिंगल फेज बंद; शेतकऱ्यांचा संताप अनावर, किसान मोर्चाचा आंदोलनाचा इशारा 

लोकवेध न्यूज नेटवर्क / २३ मार्च 

 

महागाव :- 

तालुक्यातील गुंज येथील ३३ केव्ही उपकेंद्रातून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सवना काळी (दौ) गुंज एजी फिटरवरील सिंगल फेज वीजपुरवठा मागील पंधरा दिवसांपासून बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

खडका येथे उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पातून शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात हा पुरवठा अत्यंत विस्कळीत असून वारंवार ब्रेकडाऊनच्या कारणावरून तासन्तास वीज खंडित ठेवली जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

वीज वितरण कंपनीकडून सौर प्रकल्पातून वीज मिळत असल्यामुळे एजी फिटरवरील सिंगल फेज बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात सौर प्रकल्पही सुरळीत चालत नसल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे. यामुळे शेतीकाम, पिकांची निगा आणि जनावरांची देखभाल यावर गंभीर परिणाम होत आहे.

 

शेतशिवारात रात्र काढणाऱ्या शेतकऱ्यांना सध्या अंधारातच काम करावे लागत असून परिसरात बिबट्यासारख्या हिंसक प्राण्यांचा वावर वाढल्याने जीवितासही धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडल्याने शेतकरी अधिकच भयभीत झाले आहेत.

 

आमच्या हक्काची वीज भांडवलदारांना पुरवली जात आहे, तर शेतीसारख्या महत्त्वाच्या क्षेत्राकडे दुर्लक्ष केले जात आहे. शेतीही एक उद्योग असून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा वीजपुरवठा मिळालाच पाहिजे.असा संतप्त सूर शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, सवना काळी (दौ) गुंज एजी फिटरवरील बंद असलेला सिंगल फेज तात्काळ सुरू करावा, अन्यथा राज्य सरकार व वीज वितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.

 

यासंदर्भात महागाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष प्रमोद जाधव, शेतकरी नेते पंजाबराव खडकेकर,भिमराव गोरे,गजानन पायघन, मदन जाधव, प्रमोद पवार, सचिन गोरे, नितीन चिपडे,बाळू राठोड, लक्ष्मण गोरे, शिवाजी लाहबर,गुलाब मते, नागेश दळवे, सेवादास जाधव, गोलू गोरे, समर्थ पुंड, शुभम पायघन, श्रीकांत लहाबर, आनंदा शिंदे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित होते.

महागावात बांधकामांची पारदर्शकता तपासणीच्या रडारवर; प्रभाग १ व ७ साठी माहिती मागणीचा अर्ज लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव :- महागाव नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ०१ व ०७ मधील सर्व बांधकामे आणि त्यावर सुरू असलेल्या व्यावसायिक उपक्रमांची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी अॅड. विवेक भाऊराव देशमुख यांनी नगर पंचायत प्रशासनाकडे अधिकृत विनंती अर्ज सादर केला आहे. सदर अर्जामध्ये प्रभागातील सर्व प्लॉटवरील बांधकामांची परवानगी, मंजूर नकाशे,तसेच संबंधित इमारतींमध्ये सुरू असलेल्या व्यवसायांची (किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, कापड दुकान, हॉटेल व इतर दुकाने) वाणिज्य परवानग्या आणि आदेश यांची सत्यप्रत मागविण्यात आली आहे. अर्जदारांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, संबंधित सर्व इमारतींच्या बांधकाम परवानग्या व नकाशे तसेच व्यावसायिक वापरासाठी आवश्यक असलेल्या वाणिज्य परवानग्या व आदेशांची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी.या मागणीमुळे प्रभागातील अनधिकृत बांधकामे किंवा नियमबाह्य व्यावसायिक वापर उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महागाव नगर पंचायत प्रशासनाकडून या अर्जावर काय कार्यवाही होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, या विषया संदर्भात प्रभाग एक आणि सात मधील व्यावसायिकांनी आणि या अर्जाच्या मागणीवर संतोष व्यक्त करत सदर तक्रारदाराच्या सनदी संदर्भात मोठी चर्चा रंगली होती.एकाच व्यक्तीचा नावे दोन लायसन कसे बरे ? असा सवालही यावळी उपस्थित केला जात असून सदर तक्रारदार नेमके कोण ? आहेत.. यात वडिलांचं बदलून गुगली..खेळी करून मी तो नव्हेच अशी तर नंतर भूमिका बजावल्या जाईल अशी जनभावना आहे. विवेक..भैय्या..सा…. की ? भाऊराव…याचा नागरिकांना संभ्रम निर्माण झाला आहे.याच प्रभात वाईनबार आहे.वाईंबार आणि देशी दारू दुकान संदर्भात येत्या काही तासांत मतदान प्रक्रिया होणार असल्याने तक्रार कर्त्याने सदर प्रभागातील नागरिकांना मुद्दाम भीती दाखविण्यासाठी तर नाही ना..हा फंडा वापरला अशा विविध चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या